top of page


पर्यावरण संरक्षणाचा अध्यात्मिक उत्सव
जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत आपल्या सर्व अनुयायांना “वृक्ष म्हणजे प्राण, वृक्ष म्हणजे धर्म” या मंत्राने प्रेरित करत देशव्यापी वृक्षलागवड संकल्प अभियान सुरू केले. त्यांच्या या दिव्य आवाहनानंतर संपूर्ण देशात भक्त, साधक आणि सेवकांनी अपार उत्साहाने सहभाग घेतला आणि १ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून एक अनोखा हरित यज्ञ साकार केला.
या मोहिमेमुळे केवळ वृक्षांची लागवड झाली नाही, तर पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, आणि भूमी पुनरुज्जीवनाचा एक आध्यात्मिक अध्याय रचला गेला. प्रत्येक लावलेले रोप हे जणू भक्ती, जबाबदारी आणि भविष्यासाठीची हरित प्रार्थना ठरले.
वृक्षारोपण - एकूण संख्या : 1,10,676
bottom of page
